निबंध - महात्मा गांधी | Essay - Mahatma Gandhi
महात्मा गांधी
महात्मा गांधीजींचे पूर्ण नांव मोहनदास करमचंद गांधी,
त्यांना सर्वजण बापू असे सुध्हा म्हणत होते.
त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर गांवी २ ऑक्टोंबर १८६९ रोजी झाला.
त्यांचे वडिल राजकोटला दिवाण होते.
त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच सत्य व अहिंसेचे शिक्षण दिले.
रामायण, महाभारताचे वाचन करावयास लावले होते.
विद्यार्थी दशेत काही वाईट मित्रांच्या संगतीने गांधीजींनी चुका केल्या.
त्यांनी आपली चुक वडिलांजवळ कबूल करुन क्षमा मागितली व नंतर त्या चुका पुन्हा कधीही केल्या नाहीत.
महात्मा गांधी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले.
आफ्रिकेत जाऊन वकिली केली.
न्याय व स्वातंत्र्यासाठी आपल्या देशात सत्याग्रह केला.
१५ ऑगस्ट १९४७ ला देश महात्मा गांधींजींच्या प्रयत्नामुळे झाला,
गांधीजींनी सत्य, अहिंसा, सुत कताई, स्वदेशी वस्तू यांचे शिक्षण लोकांना दिले.
ते सर्व धर्माचा आदर करीत.
त्यांनी हरिजनांसाठी खूप कार्य केले.
त्यांची राहणी साधी होती.
सारे जग महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून ओळखते.
Hii
ReplyDelete