बोधकथा - लाचारपणा घातक - Moral Story
एक राजा दररोज सायंकाळी घोडागाडीत बसून फिरायला जात असे. त्याचा हा दिनक्रम अनेक वर्षे चालू होता. असाच एकदा तो आपल्या घोडागाडीतून फिरावयास बाहेर पडला. त्या अगोदर रस्ता रिकामा करण्यासाठी त्याचे सेवक पुढे गेले होते.
सेवक रस्ता रिकामा करीत पुढे जात, पाठीमागून राजाची घोडागाडी जाई. असे असताना रस्त्यामध्ये एक साधू पाय पसरून पडलेला दिसला. या साधूची कीर्ती त्या संपूर्ण राज्यात होती. राजाही त्या साधूचा आदर करत असे; पण राजाच्या घोडागाडीला व्यवस्थित जाता यावे म्हणून राजाच्या सेवकांनी त्या साधूला पाय मागे घेण्याबद्दल फर्मावल; पण त्या साधूने त्या सेवकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
सेवक त्या साधूला पाय मागे घेण्यासाठी विनवत होते; पण साधू काही हलायला तयार नव्हता. सेवक आणि साधूमधील वाद बराच वेळ सुरू होता. इतक्यात खुद्द राजाची घोडागाडी तिथे आली. सेवक आणि साधूतील वाद ऐकून राजा साधूला म्हणाला, 'महाराज, आपण इतका वाद का घालत आहात? तुम्ही पाय मागे का घेत नाही?'
साधू म्हणाला,मी कधीही हात पसरले नाहीत, मग पाय मागे घेण्याचे काय कारण?'
तात्पर्य : ज्यांचे हात मागण्यासाठी पुढे असतात. ती माणसे नेहमी लाचार राहातात.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق